शेती विषयक

‘गुलाब’ चक्रीवादळ दाखल; महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस धो धो पावसाचे.

मुंबई दि.26 सप्टेंबर – बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) ‘गुलाब’ चक्रीवादळ दाखल झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओरीसा किनारपरट्टीला चक्रीवादळाचा (Cyclonic storm) इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तौक्ते वादळाचा फटका बसल्यानंर आता गुलाब या वादळाचा फटका महाराष्ट्राला कसा बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मराठवाड्यात (Marathwada) रात्री पासून पुन्हा धुंवादार पावसाला सुरुवात झाली आहे.

(Hurricane ‘Gulab’ filed; Heavy rains for Maharashtra for next four days.)

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार गुलाब हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झालं आहे. गुलाब चक्रीवादळ (Hurricane) बंगालच्या उपसगारात दाखल झालं आहे. आंध्र प्रदेश, ओरिसा किनारापट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. 26 सप्टेंबर म्हणजेच रविवारी संध्याकाळी आंध्र प्रदेश, ओरीसा किनारपट्टी या ठिकाणी धडकू शकतं. महाराष्ट्रासाठी पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा (heavy rains) इशारा देण्यात आला आहे असं ट्विट के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (heavy rain fall) पडणार आहे. तर कोकणात 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान रात्री पासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झालेली आहे. जोरदार पावासामुळे मराठवाड्यावर यंदा चांगलेच संकट कोसळलं आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
27 सप्टेंबर : औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्हयांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) देण्यात आला आहे.
28 सप्टेंबर : नंदुरबार, धुळे, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
26 सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
27 सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल.

हवामान खात्यानं (whether department) या वादळाला गुलाब असं नाव दिलं आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे चक्रीवादळ सक्रीय राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आंध्रप्रदेशातील उत्तरेचा भाग आणि ओदिशातील दक्षिणेचा भाग यांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तासात वादळाचा वेग वाढणार असल्याने हवामान खात्याने आंध्रप्रदेश आणि ओडिशात यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. 26 सप्टेंबरपर्यंत कलिंगपट्टनम भागात यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!