Cyclone & Monsoon अरबी समुद्रात चक्रीवादळ … काय असेल मान्सूनची स्थिती.

मुंबई दि.5 जून – Cyclone & Monsoon पुढील 48 तासात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे मात्र केरळात दाखल होणाऱ्या मान्सून वर परिणाम होणार असून मान्सूनचे आगमन चार दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. Cyclone & Monsoon … Cyclone in Arabian Sea … What will be the status of Monsoon.
यंदा मान्सूनने देशात वेळेवर दाखल होण्यास हुलकावणी दिली आहे. 4 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, हा मान्सून लांबला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास आणखी 3 ते 4 दिवस विलंब होणार आहे. यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सूनची हजेरी उशीरा होणार आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. तर महाराष्ट्रात 10 जून पर्यंत मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मान्सून आगमनाला विलंब होणार आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. त्यानंतर महाराष्ट्रात 13 ते 15 जून दरम्यान पावसाळ्यास सुरुवात होऊ शकते.
दरम्यान, राज्यात काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी 4 जून रोजी मुसळधार heavy rains मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झाडं उन्मळून पडली, तर काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात 5 जूनच्या सुमारास चक्रीवादळ Cyclone निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत याच भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरील चक्रीवादळासाठी महासागराची स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ तयार झालं तर त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होणार याकडे देखील हवामान विभागाचं लक्ष असणार आहे. 8 ते 10 जून दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्र किनार्याजवळ आणि 9 ते 12 जून या कालावधीत गुजरातच्या किनार्यालगत आणि समुद्राजवळच्या भागातील स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चक्रीवादळावर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.
मराठवाड्यात आज पुन्हा एकदा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मुंबईत कमालीची उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील असं हवामान विभागाने म्हटलं आहे. दरम्यान, रविवारी बीड जिल्ह्यात वीज पडून एका शेतकऱ्यासह तीन जनावरांचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात दाणादाण उडाली. प्रचंड धूळीची चादर सर्वत्र दिसून येत होती. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याचे तर पाथर्डी बीड महामार्गावरील खरवंडी टोलनाक्यावरील शेड वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली.