राज्यातील मंत्रिमंडळात 10 मार्चनंतर खांदेपालट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

मुंबई दि. 16 फेब्रुवारी – गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सेना भाजपमध्ये सुरु असलेल्या दावे प्रतिदाव्यानंतर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी राज्यातील मंत्रिमंडळात 10 मार्चनंतर खांदेपालट होणार असल्याचा गौप्यस्फोट केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
( A reshuffle in the state cabinet after March 10; Discussions abound in political circles. )
महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. राज्यातील मंत्रिमंडळात 10 मार्चनंतर खांदेपालट करण्यात येईल, असे संकेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात दिले. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपवर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे आरोप केले होते. त्याच पार्श्वभूमीवर पटोलेंच्या या नवीन दाव्याने राजकीय वर्तुळामध्ये नवीन चर्चांना उधाण आले आहे.
भंडारा येथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे संकेत दिले आहेत. नाना पटोले म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 10 मार्चनंतर बदल होणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi), काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ही वेळ दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. लवकरच राज्य सरकारमध्ये बदल दिसतील. सध्या राज्यात जे काही सगळे सुरु आहे, ते लवकरच दुरुस्त करायचे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस हा सर्वात छोटा पक्ष आहे. यामुळे आता पटोले यांच्या या दाव्यावर शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) काय भूमिका घेतात हे येत्या काळामध्ये उघड होईल. येत्या 10 मार्चला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर राज्यात जवळपास 13 पालिकांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळात बदल होणार का, याची उत्सुकता आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता हे सरकार सोनिया गांधी, शरद पवार ( Sharad Pawar ) व उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी एकत्र ऐवून स्थापन केले आहे. यामुळे “राज्याचे प्रमुख जे ठरवतील ते होईल” असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.