बीडमध्ये मोर्चाची तयारी; साताऱ्यात राडा … आशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा- विनायक मेटे.

बीड दि.6 मे – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये आज मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन (lockdown) संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं. दरम्यान, सातारा येथे गृहराज्य मंत्री गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या साताऱ्यातील निवासस्थानासमाेर शेणाच्या गोवऱ्या पेटविण्याची तर काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Naionalist Congress Party) कार्यालयावर दगडफेकीची घटना घडली असून सदरिल प्रकार काय याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
(Preparation of the front in Beed; Radha in Satara … Ashok Chavan should resign- Vinayak Mete.)
बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिली.
बैठकीत नेमकं काय ठरलं?
सुप्रीम कोर्टानं (supreme court) मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर बीडमध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना उद्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन (lockdown) संपल्यावर 16 तारखेला मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठा संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेकमुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोर्चे काढणार असल्याची माहिती यावेळी विनायक मेटे यांनी दिली. पहिल्या मोर्चा मोर्चाची सुरुवात बीड मधून होणार आहे.
अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा-विनायक मेटें
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर उतरतील, असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी सुप्रीम कोर्टाचा (supreme court) निर्णय आल्यानंतर दिला होता.
विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे औरंगाबाद येथील विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. विनोद पाटील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेद्वारे नवीन मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं. इतर राज्यातील आरक्षणाची स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहे. इतर राज्याच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी करणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. सुप्रीम कोर्टानं निकाल जाहीर केल्यानंतर तीस दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करावी लागते.
साताऱ्यात राडा …
सातारा – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या साताऱ्यातील निवासस्थानासमाेर शेणाच्या गोवऱ्या पेटविण्यात आल्या. ज्यांनी शेणाच्या गोवऱ्या पेटविल्या ते तेथून लगेच पळून गेले. त्यानंतर काही वेळेतच सातारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (Naionalist Congress Party) आणि काँग्रेस (Congress) पक्षाच्या कार्यालयांवर दगडफेक झाली. दगडफेक करणारे व्यक्ती तेथून ही पळून गेले.
या घटनेची माहिती समजाताच सातारा पाेलिस दल सतर्क झाले. पाेलिस अधिकाऱ्यांनी तिन्ही ठिकाणच्या घटनास्थळी भेट दिली. या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करणार असल्याचे पाेलिसांनी नमूद केले. अद्याप हे प्रकरण का व कोणी घडवले यासंदर्भांत तपास लागलेला नसून याची जबाबदारीही कोणी घेतलेली नाही.