माझं गाव

धारुरचा आणखी एक तारा निखळला; राजबलिसिंह हजारी यांचे निधन.

किल्लेधारूर दि.7 अॉक्टोंबर – धारुरचे मुळ निवासी व सध्या अंबाजोगाई (Ambajogoai) येथे निवासी असलेले योगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य राजबलीसिंह महावीरसिंह हजारी (वय 65) यांचे आज (दि.7) पहाटे चार वाजता निधन झाले.

(Another star of Dharur came out; Rajbalisinh Hazari passes away.)

धारुर (Dharur) येथील कटघरपुरा भागातील मुळ निवासी असलेल्या राजबलीसिंह महावीरसिंह हजारी उर्फ मानूभैय्या यांनी कुस्ती (Wrestling) खेळात राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. नामवंत मल्ल जसवंतसिंह हजारी यांचे ते कनिष्ठ बंधू होत. कुस्तीत यश मिळवल्यानंतर ते अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालय (Yogeshwari college) येथे क्रीडा शिक्षक ते उपप्राचार्य (Vice principle) म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते.

सध्या अंबाजोगाई येथील कुत्तर विहिर भागात निवासी होते. गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण होवून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात (SRTR) उपचार सुरु होते. आज दि.7 रोजी पहाटे चारच्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेलं धारुरचा एक तारा निखळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार. हजारी परिवाराच्या दुखात Beed24 न्यूज सहभागी आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!