राजकीय

Atiq Ahmed अतिक अहेमद हत्येच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती; अनेकांच्या प्रतिक्रिया …

51 / 100

प्रयागराज दि.17 एप्रिल – Atiq Ahmed अतिक अहेमद हत्येच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली असून अहेमद बंधूच्या हत्येमुळे थेट राज्य शासनाच्या कामगिरीवर ताशेरे ओढले जात आहे. विरोधकांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी थेट कायदा आणि सुव्यवस्था तसंच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ( Atiq Ahmed Three-Member Committee to Investigate Atiq Ahmed Murder; Reactions of many… )

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये दि.15 रोजी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची माध्यमासमोर हत्या करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात असताना पत्रकारांच्या वेशात आलेल्या तीन तरुणांनी अतिक आणि अशरफची गोळ्या झाडून निर्घूण हत्या केली. या हत्येनंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालय पत्रकारांच्या सुरक्षेसाठी एसओपी तयार करणार आहे. तसेच या प्रकरणाची ३ सदस्यीय समितीकडून चौकशी होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अरविंद कुमार त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश कुमार सिंग आणि निवृत्त जिल्हा न्यायाधीश ब्रिजेश कुमार सोनी यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती २ महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.

अनेकांच्या तिखट प्रतिक्रिया …..
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने एक ट्विट शेअर करत ही अराजकता असल्याची आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वरा भास्करने ट्विटरवर ट्विट करत लिहलंय की… ‘अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक ही आनंद साजरी करण्यासारखी गोष्ट नाही. हे राज्याच्या अराजकतेची स्थिती दर्शवते. हे सूचित करते की राज्य संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत किंवा त्यांना सक्षम करत आहेत. हा भक्कम कारभार नाही. ही अराजकता आहे.’ या आशयाचे ट्विट तिने केलं आहे.

विरोधी पक्षांचे टीकास्त्र.
तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांनी या प्रकरणावर बोलताना, “भाजपने देशाला एका ‘माफिया रिपब्लिक’मध्ये रुपांतरित केलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये महुआ मोईत्रा म्हणतात, “सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अतीक अहमद यांना मारलं गेलं आहे.”

बसपा नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी कायदा आणि सुव्यवस्था तसंच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेऊन कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. तर लोकसभा खासदार आणि AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “एनकाऊंटर राजचा जल्लोष करणारेही या हत्येसाठी जबाबदार आहेत.” शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पोलिस बंदोबस्त असताना झालेली हत्या चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया दिली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रियांका गांधी, राशिद अल्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय लोकदलचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार जयंत चौधरी, माजी खासदार पप्पू यादव, राज्यसभा खासदार राज्यसभा खासदार कपिल सिब्बल, खासदार कुंवर दानिश अली, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरून उत्तर प्रदेशवर टीका केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!