कोरोंना विशेष

काळजी घ्या… पुढील दोन महिने धोक्याचे; काय म्हणतात टास्क फोर्स तज्ञ.

मुंबई दि.8 अॉगस्ट – राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Second wave) ओसरली असून महाराष्ट्रात दैनंदिन रुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले आहेत. तरीही पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचे मत राज्याच्या टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. कोरोनामुक्तीच्या (Corona free) दिशेने जाण्यासाठी मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे लक्ष्य असल्याचे मतही डॉक्टरांनी व्यक्त केले.

(Be careful … the next two months are dangerous; What task force experts say.)

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून पुढचे दोन महिने संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचे मत टास्क फोर्सच्या (Task force) तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. याविषयी, कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी, सध्या राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण जास्त असून निदानाचे प्रमाण कमी आहे. कोरोना संसर्ग (Corona infection) कमी होतोय, हे खरे आहे. मात्र कोरोना गेलेला नाही हे सामान्यांनी लक्षात घ्यायला हवे असे मत मांडले.

राज्यात शिथिल केलेल्या निर्बंधांचे (restrictions) परिणाम पुढील दोन आठवड्यांत लक्षात येतील. यापूर्वीही, निर्बंध शिथिलतेनंतर नागरिकांच्या चुकीच्या वागण्यामुळे संसर्ग (corona infection) वाढल्याचे आपण पाहिलेले आहे, हा अनुभव लक्षात घेऊन येत्या काळात अधिक सतर्कपणे वागले पाहिजे. पुढील दोन महिन्यांचा काळ हा संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, महत्त्वाचे म्हणजे याकाळात बरेच सण-उत्सव आहेत.

कोरोना नियम पाळा.
नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर राखणे या नियमांचे पालन केले पाहिजे. सध्या अनेक जण मास्क लावण्यास टाळाटाळ करतात. हा प्रकार स्वत:च्या आरोग्यासह इतरांसाठीही तितकाच धोकादायक आहे, असे टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

शनिवारी दिलासा…
राज्यात शनिवारी 06 हजार 061 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 09 हजार 356 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61 लाख 39 हजार 493 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.72 टक्के झाला आहे. शनिवारी 187 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.1 टक्के आहे. राज्यात सध्यात 71 हजार 050 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!