शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या कारणावरुन विद्यार्थी मित्रास चोप; धारुरच्या मुलास अंबाजोगाईत मारहाण.

अंबेजोगाई दि.10 फेब्रुवारी – शाळेत हिंदीचा तास सुरु असताना शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नावर एका विद्यार्थ्याने उत्तर दिले. मात्र, तीन विद्यार्थ्यांना याचे उत्तर देता आले नाही. याचा राग मनात धरून शाळा सुटल्यावर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांस उत्तर न आलेल्या विद्यार्थ्यांनी हल्ला चढवून बेदम मारहाण केल्याची घटना अंबाजोगाईत घडली.
( Beating a student friend to death for answering a question posed by a teacher; Dharur’s son beaten in Ambajogai. )
अंबाजोगाई ( Ambajogai ) शहरातील आंबेडकर चौकातील ई लाईट लर्निंग कोचींग सेटंर समोर पीडित विद्यार्थ्यावर अन्य दोन विद्यार्थ्यांनी बेल्ट व लोखंडी गजाने मारहाण केली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकार पोलिसांपर्यंत ( Police ) गेले असून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यासंदर्भात मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की, धारुर ( Dharur ) तालुक्यातील कांदेवाडी हल्ली मुक्काम मोरेवाडी अंबाजोगाई या ठिकाणचा तो राहणारा आहे. पीडित विद्यार्थी अंबाजोगाई येथील छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूलमध्ये (Global school) इयत्ता 10 वी वर्गात शिक्षण घेत आहे. दि 08/02/2022रोजी सकाळी दहा वाजता पीडित विद्यार्थी रोजच्या प्रमाणे शाळेत होता.
शाळेमध्ये हिन्दी विषयाचा तास सुरु असताना हिंदीच्या शिक्षिका वैशाली शिंदे यांनी वर्गातील चार ते पाच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. या प्रश्नावर पीडित विद्यार्थ्याने उत्तर दिले पण त्याच्या सोबत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.
तेव्हा शाळेतील तास पूर्ण झाल्यानंतर उत्तर न आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाने पीडित विद्यार्थ्याला तुला लई ऊत्तर येतात का ? तु शाळा सुटल्यावर भेट ? मी तुला दाखवतो असे म्हणून त्या विद्यार्थ्याने पीडित विद्यार्थ्याला शिवीगाळ केली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर पीडित विद्यार्थी स्कुटीवर बसून आंबेडकर चौकातील ई लाईट लर्निंग कोचींग सेटंर (learning centre) समोर बसला होता. तेथे उत्तरे न आलेले दोन विद्यार्थी व इतर तीन अनोळखी मुले पीडित विद्यार्थ्याजवळ आले.
तेव्हा एका विद्यार्थ्याने त्याचे हातातील चामडी बेल्टने पीडित विद्यार्थ्याच्या पाठीवर मारहाण केली. तर दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने पीडित विद्यार्थ्याच्या दोन्ही हातावर मारून दुखापत केली व इतर आनोळखी तीन जणांनी पीडित विद्यार्थ्याला लाथाबुक्याने मारहाण केली. तेव्हा तेथे बाजुला असलेल्या वडापाव विक्रेत्याने पीडित विद्यार्थ्याची त्यांच्या तावडीतून सुटका केली व पीडित विद्यार्थ्याला त्याच्या स्कुटीवर बसवून घरी पाठून दिले.
नंतर घडलेला प्रकार शिकवणीच्या शिक्षकांनी पीडित विद्यार्थ्याच्या वडीलांना फोन करून सांगितला. त्यानंतर वडिलांनी पीडित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करून औषधोपचार घेतला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात दोन विद्यार्थी व तीन अनोळखींवर गुन्हा दाखल (crime register) करण्यात आला आहे.