बीड जिल्हाधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना आवाहन; विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांचा लॉकडाऊनचा इशारा

बीड/औरंगाबाद दि.२ मार्च – कोरोनाची रुग्ण संख्या मराठवाड्यात वाढत आहे. बीड जिल्ह्यातही आठवडाभरात 245 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली. यामुळे बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी व्यापाऱ्यांना अँटीजन (antigen) तपासणीचे आवाहन केले आहे. तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर (Sunil Kendrekar) यांनी सोमवारी औरंगाबादेत सारे सुरळीत असल्याचे सारखे वागु नका, नाही तर लॉकडाऊन (Lockdown) करावे लागेल असा सुचक इशारा दिला आहे.
(Beed District Collector appeals to traders; Divisional Commissioner Sunil Kendrakar warns of lockdown)
उद्योजक, व्यापारी, रिक्षा युनीयन, पेट्रोल पंप असोशिएशन, कृषी उत्पन्न बाजार समिती, हॉटेल व्यावसाईक आणि प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी विविध संघटनेच्या घेतलेल्या बैठकीत मार्गदर्शन केले. आणि सर्वांनी गांर्भीयाने कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन या वेळी केले. अन्यथा मला कठोर कारवाइ करण्यास भाग पाडू नका, असा सल्ला देखील दिला आहे.
सर्व दुकानदारांनी दर अर्धा तासाने सॅनिटायझरचा वापर कॉउंटरवर करावा, कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. नियम पाळले नाहीतर मला दुकाने सील करावी लागतील असा इशारा केंद्रेकर यांनी दिला. रिक्षामध्ये दोन प्रवाश्यांच्यावर प्रवासी भरु नये, पेट्रोल पंप चालकांनी विना मास्क असणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल देवू नये, छोट्या – मोठ्या हॉटेल चालकांना गुन्हे दाखल करण्याचे तंबी देखील दिली आहे.
सारे सुरळीत असल्याचे सारखे वागु नका, नाही तर लॉकडाऊन (Lockdown) करावे लागेल. इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी सोमवारी औरंगाबादेत दिला आहे. औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. बीड (Beed) जिल्ह्यात मागील आठवडाभरात 245 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आरोग्य प्रशासनाने व्यापाऱ्यांसाठी अँटीजन (antigen) तपासण्या सुरु केल्या. मात्र या तपासण्याला व्यापाऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांच्या बैठकीत केले आहे.