आनंदवार्ता …. 30 एप्रिल नंतर ओसरणार दुसरी लाट, टास्क फोर्सचा अंदाज.

मुंबई दि.27 एप्रिल – राज्यातील कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona) 30 एप्रिलनंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असा महत्त्वपूर्ण अंदाज टास्क फोर्स (Task Force) मधील तज्ञ डॉक्टरांनी वर्तविला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून गेल्या काही दिवसांत आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona) ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.
(The good news is that the second wave will come after April 30, the task force predicts.)
मात्र, ही लाट ओसरल्यानंतर आपल्याला वेगाने लसीकरण (Vaccination) करावे लागेल, असेही या तज्ज्ञांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्र साधारण 12 तास सुरु राहिले पाहिजे. पहिले सहा तास वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण व्हावे. त्यानंतर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (Vaccination) व्हावे. तरच कोरोना लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठता येईल, असेही ‘टास्क फोर्स’च्या (Task Force) डॉक्टरांनी सांगितले.
लॉकडाऊन (lockdown) इफेक्ट, पुण्यात सलग आठव्या दिवशी नव्या रुग्णसंख्येत घट कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा (lockdown) घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल 15 दिवसांनंतर नव्या कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा हा 50 हजारांच्या खाली आहे. पुणे शहरातही हा बदल बघायला मिळाला आहे. एकटच्या पुणे शहरात सलग आठव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट झाल्याचं बघायला मिळालं आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 48 हजार 700 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 524 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील 71,736 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या काल मात्र समाधानकारक दिसुन आली. तर दुसरीकडे मात्र कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ सुरू असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यभरात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.