दहावी आणि बारावीच्या परीक्षासह शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : दि.६– दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही तर येत्या 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं वक्तव्य राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती प्रसंगी केलं.
दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, “जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने आहेत. म्हणून मे महिन्यात या परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येत आहे. दहावी बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी केला आहे. राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचं वर्षा गायकवाड Varsha Gaikwad म्हणाल्या. शाळा School 23 नोव्हेंबरपासून सुरु झाल्यास दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचं गायकवाड यांनी सांगितले.
School