बाजार भरवणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन; धारुरचा बाजार भरवणाऱ्या अधिकाऱ्यावर ही होणार कारवाई?

बीड दि.24 एप्रिल – कोरोना संसर्गाचा (Corona infection) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे (Disaster Management Act) उल्लंघन करून आठवडी बाजार (Weekly market) भरविण्यात आल्याच्या घटना जिल्ह्यात आढळून आल्या. अशाच घटना माजलगाव व धारुर तालुक्यात आढळून आल्या. माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी भाटवडगाव व ब्रम्हगाव येथील दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई (Suspension action) करणारा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. धारुर शहरात कडक निर्बंधात शुक्रवारचा बाजार भरवण्यात आला. या बाजार भरवण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
(Suspension of market filling officers; Will this action be taken against the officer who fills Dharur’s market?)

कोरोना संसर्गाच्या (Corona infection) दुसऱ्या लाटीचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून रोज कोरोना बाधितांची संख्या हजार ते बाराशेच्या वर जात आहे. वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात जमावबंदी, आठवडे बाजार बंदी व दहा दिवसांचा लॉकडाऊन सारखे निर्बंध लावली आहेत. यातच राज्य शासनानेही संचारबंदी लागू करून दि.22 गुरुवार पासून राज्यात कडक निर्बंध लावून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

अशातच माजलगाव तालुक्यात बुधवारी दि.21 रोजी शहराजवळ असलेल्या भाटवडगाव, ब्राम्हगाव हद्दीत आठवडी बाजार (Weekly market) भरविण्यात आला. यामुळे त्याठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा (Disaster Management Act) भंग केल्याचे निदर्शनास आले. यामुळे तहसीलदार वैशाली पाटील यांनी भाटवडगाव येथील ग्रामसेवक एस.एम. चव्हाण, ब्रम्हगाव येथील ग्रामसेवक ए. एन. दाउदसरे यांच्यावर निलंबनाची कारवाई (Suspension action) करत कार्योत्तर मान्यतेसाठीचा प्रस्ताव बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे पाठविला आहे.

असाच प्रकार धारुर शहरात नगर पालिकेच्या समोरील जागेत पालिका, महसुल व पोलिस प्रशासनाच्या परवानगीने महिनाभरापासून आठवडे बाजार भरवणे सुरु आहे. चक्क कडक निर्बंध जाहिर झाल्यानंतरही दि.23 रोजी शुक्रवारचा बाजार भरल्याचे सोशल माध्यमातून समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्याची शृंखला चक्क कडक निर्बंधातही दिसुन आली. याप्रकाराची वृत्तपत्रातही दखल घेण्यात आली असून अद्याप मात्र याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यानी कसलीही दखल घेतली नसल्याचे दिसुन आले. दरम्यान, आज शहरात पोलिस प्रशासनाने अत्यंत कडक पहारा देत विनाकारण फिरणाऱ्या लोकांना फटके देत जरब बसवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!