सावधान… पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज.

मुंबई दि.20 जुलै – राज्यात शनिवारपासून संततधार पावसाला (heavy rain) सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने (Weather department) 23 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी 2,3 स्वरूपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
(Caution … torrential rain for the next three days; Weather department forecast.)
मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार कायम असतानाच सोमवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरले. पावसाची कोसळधार कायम राहिल्याने सोमवारी अनेक सखल भागात पाणी साचले. लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला.
मुंबईत पावसाचा कहर
शनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. शनिवारी 33 जणांचा बळी मुंबईतील विविध भागात गेला. रविवारी दुपारी पावसाने उसंत घेतल्याने लोकल सेवा पूर्ववत झाली होती. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. सकाळी 15 ते 20 मिनिटे लोकल सेवा थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुरू झाली.
यानंतर विक्रोळ ते कांजूरमार्ग या दरम्यानच्या रूळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू होती. मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने मुंबई (Mumbai), उपनगरांसह लागून असलेल्या जिल्ह्यांत मुक्काम ठोकला आहे. संपूर्ण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सात तलावांत पाणी पातळीत वाढ.
दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी, या पावसामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत दोन दिवसांपूर्वी दोन महिने पुरेल इतका जलसाठा होता. मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे तलावांत दीड लाख दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली असून आता जवळपास 109 दिवस पुरेल इतका जलसाठा आहे.
अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावांमधून दररोज मुंबईकरांना 3800 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. जूनमध्ये दमदार हजेरी लावून पाऊस गायब झाल्यानंतर तलावांतील पाणीसाठा खालावू लागला होता. यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली होती.