माझं गाव

धारुर तालुक्यात दिलासा व एसबीआय फाऊंडेशनचे कोविड केअर सेंटर; आ.सोळंके यांच्या हस्ते लोकार्पण.

किल्लेधारूर दि.20 जुलै – दिलासा (Dilasa) व एसबीआय फाउंडेशन (SBI foundation) च्या वतीने धारुर तालुक्यातील हिंगणी येथे 30 बेडचे अद्ययावत कोविड केअर सेंटर (Covid care center) चा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke), यांच्या हस्ते संपन्न झाला.

(Dilasa and SBI Foundation’s Covid Care Center in Dharur taluka; Dedication at the hands of MLA Solanke.)

यावेळी माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke), बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे, जि प सभापती जयसिंग सोळंके (Jaising Solanke) , दिलासा (Dilasa) फाऊंडेशनचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले, उपप्रबंधक राजाराम चव्हाण, सहाय्यक व्यवस्थापक सहारा सर, सरपंच मीरा खाडे, प्राथमिक आरोग्य केंद्र मोहखेडच्या आरोग्य अधिकारी डॉ. उषा बांगर, जैतापूरचे उपसरपंच भागवत दराडे, उपसरपंच योगेश सोळंके, पत्रकार संतोष स्वामी, रंणजित रूपनर या कार्यक्रमास उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भयंकर सावट पसरणार असल्याचे चित्र आता निर्माण होत आहे या लाटेत ग्रामीण भागाला त्रास होऊ नये या हेतूने एसबीआय फाउंडेशन (SBI foundation) व दिलासा फाउंडेशन यांनी एकत्रित येत हिंगणी बुद्रुक येथे तीस अध्ययावत बेडचे कोविड केअर सेंटर (Covid care center) सुरू केले आहे. या सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळणार आहेत.

या केअर सेंटर मध्ये पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सह ऑक्सीजन मशीन व आधुनिक यंत्रसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यावस्थ गंभीर रुग्णांना कोविंड सेंटरला नेण्यासाठी ॲम्बुलन्स ची हि व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यात या कोविड केअर सेंटर च्या माध्यमातून जवळपास 48 लाख रुपयांचा खर्च एसबीआय फाउंडेशन सामाजिक कार्यासाठी खर्च करणार असल्याची माहिती एसबीआय फाउंडेशन च्या वतीने देण्यात आली.

कोरोना च्या तिसऱ्या लाटेचे महाभयंकर स्वरूप पाहता सर्वांनी खबरदारी घेत, मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा पालन करण्याचा सल्ला आपल्या भाषणातून आमदार प्रकाश सोळंके, डॉ. सुरेश साबळे यांनी उपस्थितांना दिला. नंदकिशोर भोसले, राजाराम चव्हाण जयसिंग सोळंके यांचे समायोजित भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलासा चे वलीअहेमद तांबोळी, एकनाथ शिंदे, सह हिंगणी येथील अवधूत सोळंके, अमर डोंगरे, भगवान हवेले, बाळासाहेब सोळंके, लहू उंडाळकर, किरण सोळंके, अविनाश पंचाळी, अविनाश सोळंके, बालासाहेब सोळंके, मुख्याध्यापक राठोड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सोळंके तर आभार प्रदर्शन रंणजित रूपनर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!