१० मे नंतर शिथिलता च्या काळात जीवनावश्यक किराणा दुकानाला परवानगी द्यावी
व्यापारी महासंघाची मागणी

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) १० मे नंतर किरणा व इतर व्यवसाय संचार बंदी शिथिल काळात चालू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
व्यापारी महासंघ किल्लेधारूर च्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांची जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यासाठी खूप मोठी भूमिका आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. निवेदनात विनंती केली आहे की १० मे नंतर जीवनावश्यक किराणा दुकान बंद ठेवून निडली अँप च्या माध्यमातून घरपोच किराणा वस्तू द्यावे हे आदेश दिले आहेत. पण किल्लेधारूर शहर व ग्रामीण भागात हे होणे शक्य नाही. कारण येथील ग्राहक हा मोठ्या प्रमाणात निरक्षर, कामगार, शेतकरी, ऊसतोड मजूर असून त्याला हा अँप ची माहीती नसल्याच्या कारणाने खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी किराणा दुकान चालू ठेवण्यास परवानगी द्यावी. त्याच सोबत ७ ते ९.३० या वेळेत बदल करून ८ ते २ असा करावा. तसेच मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर दुकान, ज्वेलरी, ऑफसेट, प्रिंटींग व इतर दुकान ही या शिथिलता काळात चालू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती चे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे केले आहे. यावर किल्लेधारूर व्यापारी महासंघ अध्यक्ष अशोक जाधव, सचिव निलेश डुबे, व्यापारी महासंघ पदाधिकारी व सदस्य यांनी विनंती केली आहे.