कोरोंना विशेष

अखेर आणखी कठोर निर्बंध लागू; अशी आहे नवीन नियमावली.

मुंबई दि.20 एप्रिल – राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या (Corona infection) पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून अखेर आणखी कठोर निर्बंध (Strict restrictions) लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील.

(Finally more stringent restrictions apply; Such is the new regulation.)

नव्या नियमानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही 7 ते 11 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

नवे  नियम काय असणार?
किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील.

नव्या नियमावलीनुसार (Guidelines) धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील.

आता राज्यात या नवीन निर्बंध (Strict restrictions) व नियमावलीची (Guidelines) अंमलबजावणी कडक करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाला (Corona infection) रोखण्यासाठी नवीन आदेशाचे पालन करण्याची स्थानिक प्रशासनासह पोलिस प्रशासनाची यात प्रमुख भुमिका असणार आहे. अनेक ठिकाणी याची यापुर्वीच अंमलबजावणी सुरु झालेली आहे. आता या नवीन नियमावलीनंतर व्यापाऱ्यांची काय प्रतिक्रिया असणार हे पहावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!