पाकिस्तानातून परतलेली गिता आता परभणीत….

परभणीः दि.२९- तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने कराचीहून (Karachi) २०१५ साली भारतात (India) परतलेली गिता (Geeta) कुटूंबियांच्या शोधार्थ सोमवारी परभणीत दाखल झाली आहे. गेली पाच वर्ष आपल्या कुटूंबियाच्या शोधार्थ गिता भारतातील विविध प्रांतात भ्रंमण करीत आहे. तिने सांगितलेल्या खानाखुना या परभणी (Parbhani) जिल्ह्यातील गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील गावांशी जुळत असल्याने या दोन तालुक्यात तिच्या कुटूंबियांचा शोध घेतला जाणार आहे. या कामासाठी गिता तब्बल तीन महिने जिल्ह्यात मुक्कामी राहणार आहे.

पंधरा वर्षांंपूर्वी सात ते आठ वर्षाची असताना गिता (Geeta) चुकून पाकिस्तानात (Pakistan) गेली होती. पाकिस्तानात एधी फाउंडेशनने तिचा सांभाळ केला. पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानी रेंजर्सला सापडल्यावर तिला एधी फाउंडेशनने दत्तक घेतल्यापासून ती कराचीत (Karachi) रहात होती. २०१५ साली बिलकीस व त्यांचे नातू सबा व साद एधी तिच्यासमवेत भारतात (India) आले होते. पाकिस्तानातून (Pakistan) भारतात पाच वर्षांपूर्वी परतलेल्या मूकबधिर गिताने कुटुंबीयांच्या शोध आता महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. गिताने सांगितलेल्या वर्णनावरून तिचे गाव शोधले जात आहे. तिच्या वर्णनानुसार रेल्वेमार्ग आणि गोदावरी काठावर तिचे गाव आहे. हा भाग परभणी (Parbhani) जिल्ह्यातील पूर्णा व गंगाखेड तालुक्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गिता व तिच्या सोबत आलेले काही जन तीन महिने परभणीत (Parbhani) मुक्कामी राहणार आहेत. सोमवार दि.२८ डिसेंबर रोजी गिताचे परभणीत आगमन झाले. तिच्यासोबत इंदुरचे सांकेतिक भाषातज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित हे आहेत. गिताच्या कुटुंबीयांच्या शोध घेण्याच्या कामात महाराष्ट्र राज्य मूकबधिर मंडळाचे अध्यक्ष मनोज पटवारी, उपाध्यक्ष अनिकेत शेलगावकर आणि पहल फाउंडेशन तसेच रेल्वे प्रवासी सेनेचे संस्थापक संतोषकुमार सोमाणी हे सहकार्य करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!