लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

मुंबई दि. 29 नोव्हेंबर – कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेचा धोका आता संपला अशी शक्यता असतानाच नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे.
(If you don’t want lockdown, you will have to abide by health restrictions – Chief Minister Uddhav Thackeray.)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी महत्त्वाची बैठक घेतली असून ‘कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, लॉकडाऊन (lockdown) नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील’ असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड विषयक बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या नव्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच, राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.
कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे निर्देशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला दिले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला होता. पण, आता लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारला दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून येणाऱ्या प्रवाशी विमानांची वाहतूक थांबावावी किंवा योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे.
विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली (guidelines) दरम्यान, राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे.
शनिवारी जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची (restrictions) व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम आणि दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नवीन सुचना.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 1 डिसेंबरपासून भारतामध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. आता प्रवासाच्या आधी निगेटिव्ह RT-PCR अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे आणि प्रवासापूर्वी 14 दिवसांच्या प्रवासाचा तपशील सादर करावा लागेल.