महत्त्वाची बातमी… बारावीच्या परीक्षेत बदल; पहा कोणत्या पेपरच्या तारखेत बदल…

पुणे दि.24 फेब्रुवारी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बारावीच्या परीक्षेच्या (HSC board exam) वेळापत्रकात काही बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
( Important news for 12th graders; Changes to the date of this paper …)
राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा येत्या 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या नियोजनाच्या दृष्टीने राज्य शिक्षण मंडळाने परराज्यातून प्रश्नपत्रिकांची छपाई करून घेतली आहे.
या प्रश्नपत्रिका (Question paper) एका ट्रकमधून नाशिकमार्गे (Nashik) पुण्याच्या दिशेने येत असताना या ट्रकला आग लागली. त्यात बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव अशोक भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.
बारावीच्या (HSC) परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील, पुढील दोन ते तीन दिवसांत घडलेल्या घटनेबाबत पुढे काय उपाययोजना करणार याची माहिती राज्य मंडळाकडून दिली जाईल. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने आता प्रश्नपत्रिका छापून त्याचे वितरण करण्याबाबतचे नियोजन केले जाईल अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे ( State Board of Education ) अध्यक्ष
शरद गोसावी यांनी दिली होती.
असा होणार बदल…
बोर्डाच्या वाहनाला संगमनेर येथे आग लागली होती. त्या आगीत पेपर जळून नष्ट झाल्यामुळे परीक्षा बाबत प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 5 मार्चचे पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर, 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत.
5 मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते.हे पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर, 7 मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. मात्र आता हा पेपर 7 एप्रिलला होणार असल्याचं समजतंय.