कोरोंना विशेष

येत्या दोन, तीन दिवसांत देशात येणार कोरोना त्सुनामी; जुलै-ऑगस्टदरम्यान कोरोनाची तिसरी लाट.

नवी दिल्ली दि.1 मे – येत्या दोन ते तीन दिवसांत देशातील कोरोना विषाणूचा (Corona virus) संसर्ग शिगेला पोहोचेल, असे भाकीत केंद्र सरकारने नेमलेल्या शास्त्रज्ञांच्या गटाने वर्तविले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग 3 ते 5 मेदरम्यान शिगेला पोहोचू शकतो. कोरोना विषाणू (Corona virus) संसर्ग शिगेला पोहोचण्याची वेळ आपल्या अपेक्षेपेक्षा लवकर आली. कारण, कोरोनाचा संसर्ग अपेक्षेपेक्षा वेगाने फैलावला, असे मत या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. तर आगामी जुलै-अॉगस्टमध्ये देशात कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.

(In the next two, three days, the corona infection will reach its peak in the country; The third wave of corona between July-August.)

शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख एम. विद्यासगार यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी यासंदर्भात संवाद साधला. आमच्या अंदाजानुसार, आगामी आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांची संख्या शिगेला पोहोचेल. यापूर्वीच्या अंदाजानुसार 5 मे ते 10 मे या काळात कोरोना शिगेला पोहोचेल, असा अहवाल शास्त्रज्ञांनी केंद्राकडे सादर केला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अपेक्षित वेळेपेक्षा आधी शिगेला पोहोचल्याचे आता स्पष्ट होत आहे.

गेल्या नऊ दिवसांपासून देशात दररोज 3 लाखांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर शुक्रवारी हा आकडा 3.86 लाख या उच्चांकी पातळीला जाऊन पोहोचला होता. कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशात आरोग्ययंत्रणा कोलमडली आहे. परिणामी अनेकांना बेडस्, ऑक्सिजन आणि औषधांसाठी झगडावे लागत आहे.

जुलै-ऑगस्टदरम्यान कोरोनाची नवी लाट येणार?
देशात जुलै आणि ऑगस्टदरम्यान कोरोनाचा संसर्ग (corona infection) शिगेला जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजांबाबत आम्ही गंभीर नाही. कारण तोपर्यंत देशातील संसर्गाची लाट ओसरलेली असेल. पण पूर्वीसारखे कोरोनाचे कमी रुग्ण आढळून येत राहतील आणि स्थिती नियंत्रणात असेल, असे विद्यासागर म्हणाले. यादरम्यान कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात येतील. पण आपण काळजी घेतल्यास ही संख्या दिवसेंदिवस कमी होईल.

एकदा बाधित झालेल्यांना कोरोना लसीच्या दोन डोसची गरज पडणार नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न पडलेल्या भारताच्यादृष्टीने एक दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांना कोरोना लसीच्या (Corona vaccine) दोन मात्रा देण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी लसीचा (Corona vaccine) केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून पुढे आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने (Penn institute of immunology) यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे.

बाधित संख्येचा नवा विक्रम…
भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 लाख 01 हजार 993 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली आहे. 3 हजार 523 कोरोना बाधितांना कालच्या दिवसात प्राण गमवावे लागले. एकूण कोरोना बळींचा आकडा 2 लाख 11 हजार 853 झाला आहे.

देशात 24 तासात चार लाखांपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचा विक्रम नोंद झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली आहे. त्यापैकी 32 लाख 68 हजार 710 सध्या सक्रिय (अॅक्टिव्ह) कोरोना रुग्ण आहेत. 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 रुग्ण कोरोना उपचारानंतर बरे झालेले आहेत, ही दिलासादायक बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!