पुन्हा 21 गावात लॉकडाऊन; बीडच्या शेजारी असलेल्या या जिल्ह्याची चिंता वाढली.

अहमदनगर दि.14 अॉक्टोंबर – अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यात 61 गावांचा लॉकडाऊन (lockdown) उठत नाही तोच पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील 21 गावांत 14 ते 23 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. इतकेच नाही तर लॉकडाऊन लागलेल्या गावात जमावबंदीही असेल. गावात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहिल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
(Lockdown in 21 villages again; Concerns grew in the district, which borders Beed.)
राज्यात कोरोनाचा उद्रेक (Corona outbreak) कमी झाल्याने कोविड निर्बंधात (restrictions) शिथिलता आणली गेली. मात्र, आता कोरोनाबाबत अहमदनगर जिल्ह्यात चिंता वाढविणारी बातमी आहे. 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत 61 गावांमधील संपूर्ण व्यवहार बंद होते. तर आता अहमदनगर जिल्ह्यात आणखी 21 गावात लॉकडाऊन लावण्यात येत आहे.
असा झाला निर्णय…
खालील तालूक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा (essential services) दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक 14/10/2021 रोजी 00.01 वाजेपासून ते दिनांक 23/10/2021 रोजी रात्री12.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
सदरच्या क्षेत्रामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल. तसेच सदर क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून कृषी माल व आवश्यक वस्तू वाहतूक वगळता इतर वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
खालील गावात असणार लॉकडाऊन…
अकोले: विरगाव, सुगाव बु., कळस बु.
कोपरगाव: टाकळी
नेवासा: चांदा
पारनेर : जमगाव, वासुंदे
संगमनेर: उंबरी, वेल्हाळे, चंदनापूरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमाला,मालदाड, सुकेवाडी, ओझर बु., जोर्वे
नगर: पिंपळगांव माळवी
श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ