कोरोंना विशेष

भारतावर लॉकडाऊनचे सावट …. घाई गडबडीत निर्णय घेणार नाही- अमित शाह

नवी दिल्ली दि.18 एप्रिल – महाराष्ट्र व दिल्लीत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत आहे. मात्र आता कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग इतर राज्यांमध्येही वेगानं हातपाय पसरत आहे. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तशी तयारी केंद्रानं केली असून दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. मात्र, रुग्‍णवाढ झाली म्‍हणून घाईगडबडीत लॉकडाऊनचा (lockdown) निर्णय घेण्‍यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

(Lockdown on India … will not make a hasty decision – Amit Shah)

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र सध्या तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही. महाराष्ट्र, दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र आता कोरोना इतर राज्यांमध्येही वेगानं हातपाय पसरत आहे. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशी तयारी केंद्रानं केली असून दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. बहुतांश राज्याचे आरोग्य मंत्री, प्रशासनातील आयएएस दर्जाचे अधिकारी आणि उच्च पदस्थदेखील बैठकीला हजर होते.

देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असून लॉकडाऊनशिवाय (lockdown) पर्याय नसल्याचा सूर या बैठकीत उमटला. तशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आली. त्यामुळे लवकरच मोदी सरकार संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊ शकतं, अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. राज्यात शिल्लक तीन टप्प्यात असणारे मतदारसंघ वगळता उर्वरित पश्चिम बंगालचा समावेश देशव्यापी लॉकडाऊनमध्ये असेल, असं सूत्रांकडून समजतं. आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीतील मतदान पूर्ण झालं आहे. या सर्व राज्यांचे निकाल 2 मे रोजी हाती येतील. मात्र तोपर्यंत थांबल्यास भारतातील (India) परिस्थिती आणखी भीषण होईल. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील काही भाग सोडल्यास संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबद्दल एकमत झाल्याचं समजतं.

24 तासांत रुग्णसंख्येच्या वाढीचा नवा विक्रम;
भारतातील (India) कोरोना रुग्णांची (Corona Positive) संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड रचला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे (Corona Positive) तब्बल 2 लाख 61 हजार 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे.

घाईगडबडीत लॉकडाऊनचा निर्णय नाही- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
मागील वर्षी कोरोना संसर्गाचे संकट वेगळे होते. त्‍यावेळी कोरोना विषाणू (Corona Virus) विरोधातील उपचारांची प्राथमिक माहितीही नव्‍हती. तसेच लसही उपलब्‍ध नव्‍हती. मात्र एक वर्षानंतर परिस्‍थिती बदलली आहे. आता कोरोना प्रतिबंधासाठी लस आहे. तसेच कोरानावरील उपचार सुविधांमध्‍येही वाढ झाली आहे. त्‍यामुळे रुग्‍णवाढ झाली म्‍हणून घाईगडबडीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्‍यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीवेळी शहा म्‍हणाले, कोरोनाचा दुसरी लाटमध्‍ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. देशातील काही राज्‍यांमध्‍ये झपाट्याने रुग्‍णसंख्‍येत वाढ होत आहे. ही बाब चिंताजनक आहेच. यासाठी देशातील वैद्‍यकीय क्षेत्रातील संशोधक याविरोधात लढा देत आहे. आता लसही उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे निश्‍चित आपण कोरोनाविरोधातील युद्‍ध जिंकू, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. जगातील अनेक देशांमध्‍ये कोरोनाची दुसरी लाटीचा फैलाव वेगाने होत आहे. भारताने आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींच्‍या 6.5 कोटी डोस निर्यात केले आहेत. तसेच देशातही सर्वच राज्‍यांमध्‍ये लसीकरण कार्यक्रम होत आहे. जगातील सर्वात वेगाने लस देणार्‍या देशामध्‍ये भारताचा समावेश आहे. देशात कोरोना लशींचा तुटवडा नाही, असा दावाही शाह यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!