जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश … बीड जिल्ह्यात चार वाजेपर्यंत अनलॉक.

बीड दि.6 जून – राज्य सरकारने अनलॉकची (unlock) प्रक्रिया सुरु करून तसे निर्देश दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश जारी करण्यात आले. बीड जिल्हा तिसऱ्या गटात येत असल्याने आता बीड जिल्ह्यात सोमवारपासून हॉटेल, सलूनसह सर्व दुकाने उघडता येणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व व्यवहार करता येणार आहेत.
(New Collector’s order … Unlocked in Beed district till 4 o’clock.)
अत्यावश्यक सेवेतील (essential service) दुकाने आठवड्याचे सर्व दिवस तर इतर दुकाने शनिवार रविवार वगळता इतर 5 दिवस उघडता येणार आहेत. तसेच आता बीड जिल्ह्यातून आंतरजिल्हा प्रवसासाठी ई-पासची (e-pass) देखील गरज पडणार नाही. एसटीबसची सेवा देखील सुरु होणार आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतर जिल्ह्याला मोकळा श्वास घेता येणार आहे. अनलॉकच्या (unlock) संदर्भातील आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत.
राज्य शासनाने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार आता 5 गटात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे निर्बंध हटविण्यात येणार आहेत. बीड जिल्हयाचा समावेश तिसऱ्या गटात आहे. याठिकाणी अत्यावशक आणि इतर सर्व व्यवहार आता सुरु करता येणार आहेत. फक्त त्यासाठी वेळेचे मर्यादा घालून देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेतील (essential services) व्यवसायांसह इतर सर्व व्यवसाय सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सुरु ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक व्यवसाय रोज तर इतर व्यवसाय शनिवार, रविवार (weekend lockdown) वगळता आठवड्यातील 5 दिवस सुरु राहतील. हॉटेल 50 % क्षमतेने आठवड्यातील 5 दिवस सुरु करता येणार आहेत. दुपारी 4 नंतर हॉटेलला पार्सल सेवा देता येईल. सलून देखील दुपारी 4 वाजेपर्यंत आणि 50% क्षमतेने सुरु ठेवता येतील. ज्या ठिकाणी साईटवर मजुरांच्या राहण्याची सोय आहे अशी बांधकामे देखील सुरु करता येतील.
क्रीडांगण, मैदाने, पार्क सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तर चित्रपटगृहे आणि मॉल मात्र बंदच राहणार आहेत. सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असून खाजगी वाहतुकीसाठी पासची आवश्यकता राहणार नाही.
जिल्ह्यात आठवड्यात शनिवार व रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. म्हणजेच विकेंड लॉकडाऊन (weekend lockdown) सुरुच राहणार आहे. दिवसभर 5 वाजेपर्यंत जमावबंदी व त्यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.