आता या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश; सर्वसामान्यांना मिळणार दिलासा.

मुंबई दि.26 मे – राज्यातील व्यापारी वर्ग लॉकडाऊन (lockdown) उठवण्याची मागणी करत असताना महाविकास आघाडी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा (Shops) अत्यावश्यक सेवेच्या (essential service) प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

(Now these shops are included in the essential service; Everyone will get relief.)

अगदी काही दिवसांवर पावसाळा आला असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आलेला नाही. राज्यातील रुग्ण संख्या घटत असताना अद्यापही 15 जिल्हे रोड झोनमध्ये आहेत. अशात लॉकडाऊन (lockdown) उठवण्यासाठी व्यापाऱ्यांचा दबाव वाढत आहे. 1 जूनपासून राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊनमधील निर्बंध उठवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

नुकतेच तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील, अशा साहित्यांची दुकाने आणि व्यवसाय सुरु करण्यास सरकारने परवानगी देऊ केली आहे. लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध असलेल्या ठिकाणी लोकांची गरज पाहून निर्णय घेतला जात आहे.

त्यामुळे आता शहरांमध्येही हार्डवेअर आणि पावसाळी साहित्याची दुकाने (hardware and construction) सुरु करता येतील. अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी देण्यात आलेल्या वेळेतच ही दुकाने सुरु राहतील. मात्र, कोविड नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

छत्र्या, ताडपत्री, रेनकोटची दुकाने उघडता येणार
राज्य सरकारने छत्र्या, ताडपत्री आणि रेनकोटची दुकाने (Shops) उघडण्यासही परवानगी दिली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात घरांची शाकारणी, त्याचप्रमाणे शहरी भागात गळती असणाऱ्या ठिकाणी ताडपत्री लावून बंदोबस्त करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या दुकानांचा अत्यावश्यक दुकानांच्या (essential service) यादीत समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!