17 अॉगस्ट बुधवारी सकाळी 11 वाजता होणार महाराष्ट्रात समुह राष्ट्रगीत गायन.

मुंबई दि.16 अॉगस्ट – 17 अॉगस्ट बुधवारी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने समूह राष्ट्रगीत गायन केलं जाणार आहे. नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. यामुळे महाराष्ट्र एक मिनिटासाठी स्तब्ध होवून राष्ट्राचा सन्मान राखणार आहे.
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र शासनाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहिम राबवली. आता राज्य शासनानेही दि.17 अॉगस्ट बुधवार रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर समुह राष्ट्रगीत (National anthem) गायनाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून (Maharashtra government) समुह राष्ट्रगीत गायनबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. राज्यातील खासगी, शासकीय तसंच इतर सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधील शिक्षक विद्यार्थी सहभाग असणार आहे. तसंच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
काय आहेत राष्ट्रगीत गायनाचे नियम…
भारताचे राष्ट्रगीत गायन अवघे 52 सेकंदात पूर्ण होते. परंतू साधारणपणे एक मिनिटांचा कालावधी राखीव ठेवून राष्ट्रगीन गायन केले जाते. कारण राष्ट्रगीत गायनाला सुरुवात करताना आधी ढोल वाजवून अथवा तोंडी सूचना देऊन सर्व उपस्थित राष्ट्रगीत सन्मानासाठी उभे असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. त्यानंतरच राष्ट्रगीत गायन सुरू करता येते.
कशी आहे शिक्षेची तरतूद …
राष्ट्रगीताच्या गायन – वादनासंबंधी प्रत्येक राष्ट्रात विशिष्ट नियम, संकेत व रूढी निर्देशित केलेल्या आहेत. भारताचे नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरीकांनी राष्ट्रगीत गायन सुरू असताना सावधान मुद्रेमध्ये उभे राहून राष्ट्राच्या राष्ट्रगीताचा सन्मान राखणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्रगीत गायन सुरू असताना इतर उपस्थितांनीही उभे रहावे अशी विनंती करणे बंधनकारक आहे. या संकेतांचा भंग केल्यास राष्ट्राची अप्रतिष्ठा केली असे गृहीत धरून त्यासाठी योग्य दंड अथवा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
( On Wednesday, August 17 at 11 a.m., group singing of the national anthem will be held in Maharashtra.)