माझं गाव

कॕप्टन साखरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.

किल्लेधारूर दि.17 मे – येथील निवृत्त आरनरी कँप्टन वशिष्ठ बाबूराव साखरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी (दि.16) रोजी निधन झाले. त्यांच्यावर चिंचपूर ता.धारुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धारुर तालुक्यातील चिंचपुर येथील मुळ निवासी असलेले कॕप्टन वशिष्ठ साखरे धारुर शहरातील आसरडोह रोडवरील शिक्षक कॉलनीत स्थायिक होते. त्यांनी 105 ईजिनिर बटालियन मध्ये 30 वर्ष सेवा केली. 2015 मध्ये कॕप्टन या पदावरुन ते सेवानिवृत्त झाले. सोमवारी रोजी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अंबाजोगाच्या स्वा.रा. तिर्थ दवाखान्यात हालविण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांना दुसरा झटका आला. यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा नातवंड असा परिवार आहे . त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सांयकाळी त्यांचे मुळगाव चिंचपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कॕ. साखरे हे अतिश मनमिळावू स्वभागाचे होते. त्यांच्या निधनानंतर येथील धारुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

Captain Sakhre dies of heart attack

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!