अबब तीन दिवसात १२ कोरोना बळी….

बीडः– दि.८;- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना (corona death) बळींचा आकडा वाढतच असुन दि.५ ते ७ आक्टोंबर बुधवार रोजी तीन दिवसात कोरोनावर उपचार घेत असलेले १२ जन दगावल्याची माहिती बीड जिल्हा आरोग्य विभागाकडे नोंदवली गेली. यासोबतच जिल्ह्यात कोरोना बळीची संख्या ३२५ झाली आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली. केवळ तीन महिन्यात कोरोना (corona) बाधितांची संख्या दहा हजारावर झाली. रुग्ण संख्या वाढली तसा मृत्यू दरही वाढत आहे. कोरोनामुळे मृत पावणाऱ्यात वृध्दांची संख्या अधिक आहे. अजूनही मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागास अपयश आले आहे. दि.५ रोजी पाच, दि.६ रोजी सहा तर दि. ७ बुधवार रोजी १ अशी तीन दिवसात जिल्ह्यात १२ जन दगावले. यात केज तालुक्यातील ३, अंबाजोगाई तालुक्यातील ६, माजलगाव, बीड, आष्टी तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बळीचा (corona death) आकडा ३२५ झाला आहे.