Politics पुन्हा राजकारण तापले ; शिंदे गटाच्या 16 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी दिली नोटीस.

मुंबई दि.8 जुलै – Politics गेल्या आठवडाभर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात होत असून आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावली आहे. या सर्व आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
( Politics heated up again; 16 MLAs of the Shinde group were given notice by the Speaker of the Vidhan Sabha. )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यासह तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, लता सोनवणे, रमेश बोरनाळे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, बालाजी किणीकर आणि बालाजी कल्याणकर या शिवसेनेच्या आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या
16 आमदारांच्या अपात्रतेवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष Speaker राहुल नार्वेकर यांना दिले जावेत, अशा विनंतीची याचिका शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे एका याचिकेद्वारे नुकतीच करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय Politics उलथापालथी सुरू असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या गटाने शिंदे फडणवीस Eknath Shinde सरकारमध्ये प्रवेश करत 9 जणांनी रविवारी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याच काळात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास राहुल नार्वेकर यांनी विलंब केला असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्षांनी Speaker शिंदे आणि ठाकरे गट मिळून एकूण 54 आमदारांना नोटीस बजावली असून सात दिवसांत आपले म्हणने मांडण्याची मुभा दिली आहे. यामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून कोणता निर्णय येणार याची उत्सूकता वाढली आहे.