लग्नात जेवल्यानंतर २०० जणांना विषबाधा…

लातूर: दि.२५- लातूर (Latur) जिल्ह्यात विवाह सोहळ्यात जेवण केल्यानंतर २०० जणांना विषबाधा (Food Poison) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून लातूरमध्ये वऱ्हाडींवर उपचार सुरु आहेत. सुदैवाने यात कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र ऐन लग्नघरात धाकधूक लहान मुलांसह दोनशे जणांची प्रकृती बिघडल्यामुळे चांगलीच धावपळ उडाली.

लातूर (Latur) जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात वाढवणामध्ये काल ही घटना घडली. इसाक हवालदार यांच्या मुलीचे लग्न (Marriage) होते. लग्न (Marriage) सोहळ्यात जेवण केल्यानंतर अनेक जणांना त्रास सुरु झाला. मळमळ, चक्कर यासारखी लक्षणं जाणवल्याने जेवणानंतर अनेकांना त्रास सुरु झाला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. वऱ्हाडींना लातूरमधील वाढवणा, जळकोट आणि उदगीर भागातील दवाखान्यात भरती करण्यात आले. वऱ्हाडी रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सुदैवाने कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र एकाच वेळी दोनशे जणांची प्रकृती बिघडल्यामुळे लग्नघरात धाकधूक वाढून चांगलीच धावपळ उडाली होती. विषबाधा (Food Poison) होण्याचे नक्की कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!