दिवाळी सणाच्या बाजारात मोबाईल चोरांचा धुमाकूळ….

किल्लेधारूर दि.१४(प्रतिनिधी) शहरांमध्ये दिवाळीनिमित्त बाजारामध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांचे मोबाईल चोरुन पळ काढल्याची घटना घडली आहे.
धारुर तालुक्यातील असोला येथील लक्ष्मण अर्जुन सोनवणे हे बाजा करण्यासाठी बाजार मध्ये गेले. बाजारात मोठी गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेत त्यांचा मोबाईल चोरट्यांनी पळवला. सदरील बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मोबाईल चोरीची तक्रार नोंद केली. मोबाईलची एकूण किंमत 9000 रुपये होती ‘ मोबाईल चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गोविंद बाष्टे करत आहेत.