बीड, परभणी, लातूर व उस्मानाबादसाठी पुढचे काही तास पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज.

मुंबई दि.27 सप्टेंबर – गेल्या आठवड्याभरापासून पावसानं राज्यात हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा आता आणखी तीव्र झालेला आहे. पुढील काही तासात नांदेड, लातूर (Latur), उस्मानाबाद, सोलापूर, बीड (Beed), पुणे, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या (rain fall) पावसाची शक्यता हवामान विभागानं (Meteorological Department) वर्तवली आहे.
(Rain for Beed, Parbhani, Latur and Osmanabad for next few hours; Weather account forecast.)
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु असून आणखी जोर वाढेल असा हवामान खात्याचा (whether department) अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. पुढील तीन तासात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, पुणे, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यासोबतच काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पावसाचा (heavy rain) धोका लक्षात घेत हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुलाब चक्रीवादळ (Cyclonic storm) आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकतं. उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशा किनारपट्टीसाठी ऑरेंज’ अलर्ट (orange alert) जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, अजून किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकलं नसताना देखील गोपालपूरमध्ये हवामानात तीव्र बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.