माझं गाव

Sarpanch reservation मंगळवारी पडणार 56 ग्रामपंचायतच्या सरपंच पदांचे आरक्षण;

65 / 100

किल्ले धारूर दि.20 मार्च – Sarpanch reservation पुढील पाच वर्षांसाठी तालुक्यातील 56 ग्रामपंचायतच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत शासकिय नियम व आदेशानुसार दि.25 मार्च मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. तरी तालूक्यातील ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार श्रीकांत निळे यांनी केले आहे.

धारूर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कडील राजपत्रा प्रमाणे तालुकानिहाय जिल्हयातील सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी पाच वर्षाकरिता सन 2025 ते 2030 या दरम्यान गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. धारूर तालुक्याचा आरक्षण तपशिल सरपंच पदे पुढील प्रमाणे आहे, अनुसूचित जाती-09 पदे, अनुसूचित जमाती-02 पदे, नागरिकांचा मागास प्रवर्ग-15 पदे, खुला प्रवर्ग-30 पदे असे एकुण 56 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक 25 मार्च मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय, तळ मजला धारूर येथे काढण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील नागरिकांनी सदरचे आरक्षण सोडतीस उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार श्रीकांत निळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!