धक्कादायक… सततच्या कुरबुरीतून पती पत्नीची आत्महत्या; पाच लेकरं झाली पोरकी.

औरंगाबाद दि.1 जुलै – सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव या ठिकाणी घटना बुधवारी दुपारी पती पत्नीच्या आत्महत्येची ही घटना उघडकीस आली. पाच लहान मुले असून देखील आई- वडिलांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. संतोष कडू पाडळे (वय 38), संगीता संतोष पडले (वय 32) असे मृत पती पत्नीचे नाव आहे. नेहमीच्या कौटुंबिक भांडणाला कंटाळून ही आत्महत्या (Suicide) झाल्याचे समजते.
(Shocking … Husband and wife commit suicide due to constant quarrels; Five children were orphaned.)
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी कि, नेहमीच्या कौटुंबिक वादाला कंटाळून माहेरी निघालेल्या बायकोने नवऱ्यासमोर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तर पत्नीने आत्महत्या केली म्हणून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पडळे दांपत्याला चार मुली व एक मुलगा आहे. ते शेती करून आपल्या कुटुंबाची उपजिविका भागवत असत.
मात्र, शुल्लक कारणावरून त्यांच्यात मागील काही वर्षांपासून कुरबुर सुरु होती. बुधवारी दोघांचे भांडण झाले. त्याच्या रागात संगीता आपल्या माहेरी पायी निघाल्या. पतीने आपल्या घरी चल असे म्हणत संगीताची समजूत काढली.
दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील खंडाळा रस्त्यावर दोघांचे भांडण झाले. तेव्हा संगीताने पती व मुला समोर विहिरीत उडी मारली. संगीताचा जीव वाचण्या ऐवजी पती संतोष याने तिथून पळ काढला व घरी जाऊन स्वतः देखील आत्महत्या (Suicide) केली. दरम्यान, त्या पाच मुलांचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पोलिसात (Police) आकस्मातची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सिल्लोड पोलिस (Police) करत आहेत.