शुक्रवारी 15 हजार क्रॉस… कोरोना नियंत्रणात अपयश

मुंबई दि.13 मार्च- राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे तब्बल १५ हजार ८१७ नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत. तर ५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दररोज वाढणाऱ्या संख्येमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहे.
(Friday 15 thousand cross … Corona control failure)
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात कोरोना रुग्ण वाढ सुरुच आहे. शुक्रवारी तब्बल १५ हजार ८१७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्यात २४ तासात ११ हजार ३४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) आजपर्यंत एकूण २१ लाख १७ हजार ७४४ कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७९% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या २.३१ % एवढा आहे. राज्यात सध्या एकूण १ लाख १० हजार ४८५ ॲक्टिव्ह रुग्ण (Active patients) आहेत.
सर्वाधिक रुग्ण पुण्यात
राज्यातील पुणे, नागपूर आणि मुंबई या शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ गेल्या २४ तासात झाली आहे. नागपूर शहरात १७२९ रुग्ण आढळले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात १८५४ रुग्ण आढळले आहेत तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत १६४७ रुग्ण आढळले असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या याच शहरात ॲक्टीव रुग्णांची (Active patients) संख्या अधिक आहे.