धक्कादायक… अपहृत व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला.

श्रीरामपूर दि.7 मार्च- राज्याच्या अधिवेशनात चर्चिला गेलेल्या बेलापूर येथील अपहृत व्यापाऱ्याचा (kidnapped trader) मृतदेह आढळून आला आहे. गेल्या सहा दिवसांपुर्वी बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचे अपहरण झाले होते. त्यांचा कुजलेला मृतदेह येथील एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून आला. राज्याच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना प्रश्न विचारला होता.
(Shocking … The body of a kidnapped trader from Belapur was found.)
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने अपहरणकर्त्यांनी त्यांचा यापूर्वीच घातपात केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पोलिसांना त्यांचा व अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यात अद्याप अपयश आलेले आहे. शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी बेलापूर येथे येऊन अपहरण प्रकरणाची माहिती घेतली होती. त्यांच्या शोधासाठी चार पथके रवाना करण्यात आली होती. मात्र उपयोग झाला नाही. पोलिसांना (Police) हिरण यांच्या अपहरणा मागील हेतू शेवटपर्यंत समजला नाही. त्यामुळे तपासाची निश्चित अशी दिशा घेता आली नाही.
स्थानिकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीवरून पोलिसांनी एका व्हॅनचा तपास केला. मात्र त्यात तथ्य आढळून आले नाही. या दरम्यान पोलिसांचा (Police) वेळही वाया गेला होता. हिरण यांच्या अपहरणानंतर बेलापूर येथे शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. घटनेची गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही अधिवेशनात याप्रकरणी गृहमंत्र्यांना प्रश्न उपस्थित केला होता. श्रीरामपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पत्र देत हिरण यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी केली होती.