पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा- पालकमंत्री धनंजय मुंडे
मांजरा धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याचे जलपूजन संपन्न

बीड दि.२६ (जि.मा.का.)- मांजरा धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याचे जलपूजन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे Dhananjay Munde यांच्या हस्तेे झाले. याप्रसंगीे धरणातील पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केले.
मांजरा धरणातून बीड सह उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याची तहान भागवली जाते. मागच्या कालखंडात हे धरण कोरडे पडले होते. या धरणाच्या वरी नियमाने अनेक तलाव झाले आहेत. पाऊस काळ कमी असल्यामुळे या धरणापर्यंत पाणी येत नव्हते. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरत आले आहे. या प्रकल्पातील पाण्याचे जलपुजन आज करण्यात आले. केज तालुक्यातील धनेगाव येथे आज पालक मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्या हस्ते मांजरा धरणातील पाणीसाठ्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी आमदार संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, शिवाजी सिरसट, शंकर उबाळे, दत्ता पाटील, सभापती बजरंग सोनवणे, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री मुंडे Dhananjay Munde यांनी धरणातील पाणी वाया जावू नये यासाठी आवश्यक बाबी तात्काळ करण्यात याव्यात अशी सुचना जलसंपदा विभागास केली.