‘त्या’ क्षणापासून लागणार कडक लॉकडाऊन- आरोग्य मंत्री राजेश टोपे.

मुंबई दि.12 अॉगस्ट – काल दि.11 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) राज्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात राज्यात सर्व ठिकाणी आता रेस्टॉरंट्स, हॉटेल्सला 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू या निर्णयानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास पुन्हा कडक लॉकडाऊन (lockdown) लावण्याचा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिला आहे.
(Strict lockdown will take place from ‘that’ moment- Health Minister Rajesh Tope.)
राज्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. अनलॉकच्या (Unlock) निर्णयाची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून होणार आहे. मात्र याचवेळी पुढील लॉकडाऊन कधी लागू होईल याचा इशाराही टोपे यांनी यावेळी दिला. राज्यात निर्बंधांमध्ये (restrictions) शिथिलता देण्यात आली असली जरी ज्या दिवशी राज्याची ऑक्सिजनची (oxygen) मागणी 700 मेट्रीक टनच्या वर पोहोचेल तेव्हा राज्यात लगेच कडक लॉकडाऊन जारी केला जाईल, असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
राज्यातील शॉपिंग मॉल्सला (shopping malls) रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्समध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona vaccine) दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, लग्नकार्यासाठी खुल्या जागेवर 200 माणसांना तर बंद हॉलमध्ये निम्म्या क्षमतेच्या किंवा 100 माणसांपर्यंत उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. अनलॉकसंदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले सर्व निर्णय 15 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.