धारूर तालूक्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीपूर्वी अनूदान; महसूल प्रशासनाची माहिती.

किल्लेधारूर दि.31अॉक्टोंबर – मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rains) शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान झाले होते. धारूर (Dharur) तालूक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 26 कोटी 73 लक्ष रुपये अनूदान प्राप्त झाले असून त्याचे वितरण दिवाळीपुर्वी व्हावे यासाठी महसूल यंत्रणा (Revenue Department) तत्परतेने काम करत आहे. पहिल्या टप्प्यात 10 कोटी 7 लक्ष रुपयाचे अनूदान (subsidy) वितरणाची प्रक्रीया अंतीम टप्प्यात असल्याची माहिती नायब तहसिलदार रामेश्वर स्वामी यांनी दिली आहे.
(Farmers in Dharur taluka to get subsidy before Diwali; Revenue administration information.)
अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य शासनाने (State Government) केली होती. प्रती हेक्टर प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत हि नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. धारूर तालूक्यात या नुकसान भरपाई पोटी 26 कोटी 73 लाख रुपये अनूदान वितरणासाठी प्राप्त झाले असून दिवाळी पर्यंत हे अनूदान शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करण्यासाठी महसूल प्रशासन तत्परतेने कार्यवाही करत आहे.
पहिल्या टप्प्यात 17 हजार 316 शेतकऱ्यांना 10 कोटी 76 लाख रुपयाचे अनूदान वितरणाची प्रक्रीया अंतीम टप्प्यात असून 40.25 टक्के हे प्रमाण असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व मंडळ अधिकारी व तलाठी परिपूर्ण याद्या बनवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. दिवाळी (Diwali) पुर्वी अनूदान वितरीत होण्यासाठी महसूल यंत्रणा प्रयत्न करत असल्याची माहिती नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी दिली आहे.