पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा मोठा निर्णय…

बीड दि.२९(प्रतिनिधी) सतत वीस वर्षे संघर्ष करुन तसेच शासन निर्णय होऊनही पदवीधर (Graduate) अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न कायम असून अंशकालीन कर्मचाऱ्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. सदरील प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे हताश झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षा रेखाताई आहेरराव व प्रदेश सचिव मिलींद भोले यांच्या आदेशानूसार होऊ घातलेल्या पदवीधर निवड (Graduate constituency Election) मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) शासन निर्णयान्वये पदवीधर (Graduate) अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देणे संबंधी धोरणात्मक निर्णय घेऊन सुद्धा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात (Maharashtra) अद्याप सदर निर्णयाची अंमलबजावणी होऊन एक ही अंशकालीन उमेदवारास नियुक्ती मिळाली नाही. मागील वीस वर्षांपासून संघर्ष करुन देखील शेवटी पदरी निराशाच आली असून राज्यातील पदवीधरांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन सुद्धा प्रशासकीय अधिकारी वरील शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यास उदासीनता दाखवत आहेत. यामुळे राज्यातील सर्व अंशकालीन कर्मचारी राज्यात १ डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणूकीसाठी (Graduate constituency  Election) मतदान न करण्याचा निर्णय पदवीधर अंशकालीन संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई आहेरराव यांच्या आदेशानुसार प्रदेश सचिव मिलिंद भोले बीड, प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल सईद, प्रदेश कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण कोल्हापूर, नांदेड जिल्हा अध्यक्ष शेख पाशा, उस्मानाबाद भैरव खांडेकर, लातूर बोडके नंदकुमार, जालना रमेश गायकवाड, हिंगोली बंडू कदम, औरंगाबाद उत्तम शिंदे आदी महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात अठरा हजार सहाशे चौरेचाळीस पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!