Accident … धारुरहून बीडकडे निघालेल्या माय लेकरांचा दुर्दैवी अंत ; बहिणीच्या शेवटच्या भेटीने हळहळले गाव.

किल्लेधारुर दि.11 सप्टेंबर – Accident .. धारुरहून बीडकडे निघालेल्या कुटूंबावर घाटसावळीनजीक बकरवाडी फाट्याजवळ काळाने घाला घातला. परळीकडे जाणाऱ्या कंटेनरने बीडकडे जात असलेल्या रिक्षाला चिरडल्याने यात आई व दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर चालक असलेले वडिल गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे धारुर व थेटेगव्हाण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड येथील शेख अजीम (रा. राजू चौक, बीड) आपल्या पत्नी व दोन लेकरांसह सासरवाडी असलेल्या थेटेगव्हाण ता. धारुर येथे नातलगांना भेटण्यासाठी दि.10 रविवारी आपल्या रिक्षातून आले होते. दिवसभर नातेवाईकांच्या भेटी घेवून सांयकाळी धारुर Dharur शहरातील पत्नीच्या बहिणीला भेटून परत बीडकडे निघाले होते. रात्री आठच्या सुमारास घाटसावळी नजीकच्या बकरवाडी फाट्यावर परळीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनर (क्र. एमएच 12 आरएन 0873) याने बीडकडे जाणाऱ्या रिक्षास (क्र. एमएच 20 एफएफ 0312) समोरासमोर धडक देवून चिरडले. या भीषण अपघातात रिक्षा अक्षरशः चक्काचूर होवून रिक्षा मधील नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13), अदनान अजीम शेख (वय 12) यां तिघांचा अपघातात accident जागीच मृत्यू झाला. तर चालक शेख अजीम गंभीर जखमी झाले. जखमी अजीम यांना तात्काळ बीड Beed येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे accident बीड शहरातील राजू चौक परिसर, धारुर Dharur व थेटेगव्हाण येथे हळहळ व्यक्त होत आहे.