मोठी बातमी… केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणमध्ये पोलिस दाखल; वादग्रस्त वक्तव्य भोवणार.

नाशिक दि.24 अॉगस्ट – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नाशिकसह (Nashik) माहाड व पुणे (Pune) येथे गुन्हे दाखल झाली आहेत. सध्या चिपळूणमध्ये पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा राणे यांच्या मुक्काम असलेल्या रीम्झ रिसोर्ट येथे जमला आहे.

(Big news … Police filed in Chiplun to arrest Union Minister Narayan Rane; Controversial statements will surround.)

नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूणकडे रवाना झाले आहे. भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) सध्या महाराष्ट्रभर सुरु आहे. सध्या ही यात्रा कोकणात सुरु आहे. आज (मंगळवार, 24 ऑगस्ट) चिपळूण (Chiplun) येथून ही यात्रा सुरु होणार आहे. नाशिक पोलिसांचे पथक वेळेत पोहोचले तर चिपळूण येथूनच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
रायगड येथील महाड येथे नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पोहोचली. या यात्रे दरम्यान सोमवारी (23 ऑगस्ट) बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली. नारायण राणे म्हणाले की, ”त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती” असे नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या वक्तव्यावरुन नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी हे आक्षेपार्ह विधान केले. दरम्यान, नारायण राणे यांच्यावर पहिला गुन्हा नाशिक येथे दाखल झाला आहे. नाशिक येथील शिवसेना पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नारायण राणे यांच्यावर कलम 500, 502, 505,153 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांचे विधान समाजात द्वेश आणि तेढ निर्माण करणारे ठरु शकते. या शिवाय त्यांच्या विधानावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री (Union Minister) आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना अटक करताना प्रोटोकॉलचे पालन करावे असे आदेशही पोलिसांना असल्याचे समजते. जर नारायण राणे यांना अटक झाली तर त्याची माहिती उपराष्ट्रपती आणि राज्यसभा उपसभापती व्यंकय्या नायडूंना दिली जाईल.

दरम्यान, राणे यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवसेनेत संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेकडून महाराष्ट्रभर ‘कोंबडी चोर’ टॕगलाईन सुरु करण्यात आली असून तसे बॕनर लावण्यात आले आहेत. तर चिपळूण येथे व राणे यांच्या जुहू येथील निवासस्थाना बाहेर भाजपा व शिवसेनेचे कार्यकर्ता गर्दी करत आहेत. राणे यांच्या मुक्काम असलेल्या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित झाला असून छावणीचे स्वरुप आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!