प्रधान मंत्री किसान सन्मान निधीसाठीच्या नियमात बदल; पहा काय आहेत बदल.

मुंबई दि. 17 फेब्रुवारी – प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान सन्मान निधी) च्या नियमात काही बदल करण्यात आले असून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी भारत सरकारने हे पावूल उचलले आहे.
( Change in rules for PM Kisan Sanman Nidhi; See what the changes are. )
भारत सरकारच्या प्रधान मंत्री किसान सन्मान निधी ( PM Kisan ) योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पात्र आणि गरजू शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ( Bank Account ) एका वर्षात तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट जमा केली जाते. मात्र आता सरकारने यात काही बदल केले आहेत. पीएम किसान नोंदणीमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता रेशन कार्ड ( Ration card ) अनिवार्य करण्यात आले आहे.
रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
आता ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत
जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला रेशनकार्ड क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील ( PDF File ) अपलोड करावी लागेल.
आता खतौनी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान ( Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi ) योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे.
शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देते
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत ( PM Kisan Sanman Nidhi ) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन वर्ग करते. आपण शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर तुम्ही पण PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.