ई-पास पासुन सुटका; राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवली

मुंबईः दि.३१(प्रतिनिधी) राज्य सरकारच्या वतीने राज्यातील जिल्हा बंदी उठवण्यात आली असुन आता खाजगी वाहनांची ई-पास च्या कटकटीतून मुक्ती मिळाली आहे. यासोबतच हॉटेल व लॉज सुरु करण्याचा निर्णयही अनलॉक ४ मध्ये घेण्यात आला आहे.

आज दि.३१ आगस्ट रोजी राज्यातील लॉकडाऊन पुन्हा ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनानुसार अनेक बाबतीत दिलासा देण्यात आला आहे. अनलॉक ४ मध्ये आता जिल्हा बंदी उठवण्यात आली आहे. खाजगी वाहनासाठी असणारी ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच आता हॉटेल व लॉज उघडण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, जलतरण तलाव ३० सप्टेंबर पर्यंत बंदच राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!