भीषण अपघात… कंटेनरने रिक्षाला चिरडले, सहा ठार; दोन महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा मृतात समावेश.

अहमदनगर दि.6 मे – अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आज भीषण अपघात झाला. कोपरगावच्या डाऊच खुर्द परिसरात एका कंटेनरने (Container) रिक्षाला चिरडले. या भीषण अपघातात (Terrible accident) दोन महाविद्यालयीन विद्यार्थीनीसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
प्रवाशांना घेऊन झगडे फाट्यावरून कोपरगाव कडे ॲपे रिक्षा जात असताना पगारे वस्ती जवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने राँग साईडने येवून रिक्षाला चिरडले. या रिक्षात एकूण बारा जण प्रवास करत होते. या अपघातात (Accident) सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या कंटेनरने दोन मोटरसायकल स्वारांना देखील जोराची धडक दिली आहे. यात दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर रिक्षाचा (rickshaw) अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. रिक्षात बसलेल्या प्रवाशांचे सामान आणि विद्यार्थ्यांची दप्तर सर्वत्र विखुरलेली होती. कंटेनर चालक पळून जात असताना नागरिकांना त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन महाविद्यालयीन तरुणींचा समावेश आहे.
अपघातात मृत झालेल्यांमध्ये राजाबाई साहेबराव खरात (60, रा. चांदेकसारे तालुका कोपरगाव), आत्माराम जमानसा नाकोडे (65, रा. वावी तालुका सिन्नर), पूजा नानासाहेब गायकवाड (20, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (20, रा. चांदेकसारे तालुका कोपरगाव), शैला शिवाजी खरात (42), शिवाजी मारुती खरात (52, दोघे रा. श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. जखमींना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
( Terrible accident … Container crushes rickshaw, six killed; Two college students were found dead. )