पुढील चार दिवस काळजीचे; रात्रीचे तापमान सरासरीखाली जाण्याचा अंदाज.

मुंबई दि.19 डिसेंबर – राज्यात कडाक्याच्या थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढच्या चार दिवसात रात्रीचे तापमान सरासरीखाली जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (Whether Department) वर्तविण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतही तापमानात घट पाहायला मिळत आहे. येथेही गारवा जाणवत आहे.
(The next four days of care; The night temperature is expected to be below average.)
सध्या उत्तर भारतातील राज्यांत बहुतांश भागात थंडीच्या लाटेची स्थिती आहे. आता महाराष्ट्रात (Maharashtra) कडाक्याची थंडी जाणवणार आहे. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरु झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कडाक्याची थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. येत्या चार दिवसांत रात्रीच्या किमान तापमानात (temperature) तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होऊन ते सरासरीखाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबईच्या (Mumbai) कमाल तापमानात घट झालेली दिसून येत आहे. कुलाबा येथे 19.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. येथे सरासरीच्या तुलनेत एका अंशाने घट झालेली दिसून आली. तर सांताक्रूझ येथे 9.6 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. येथे सरासरीच्या तुलनेत दोन अंशांची वाढ झाली होती.
शेकोट्या पेटल्या…
महाराष्ट्रात गेली दोन दिवस कडाक्याची थंडी जाणवत आहे. सध्या पडलेली थंडी ही गव्हासह हिवाळ्यात घेण्यात येणाऱ्या इतर पिकासाठी अनुकूल आहे. मात्र ग्रामिण भागात कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम वस्त्रांसह शेकोट्या पेटल्याचे दिसून येत आहे.
पंजाबराव डख यांचा अंदाज
दरम्यान, हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjab Dakh) यांनीही राज्यात दि. 18 डिसेंबर पासून थंडी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
-पहाटे खूप धुके, धुई, राहील पिकांची काळजी घ्यावी.
-द्राक्ष बागायतदार घाबरू नका आता पाउस येणार नाही .
-उन्हाळी सोयाबिन करायचे असेल तर 1 जानेवारी पासून करा उतार जास्त येतो.
दि.18 डिसेंबर पासून सुर्यदर्शन होउन रात्री पासून राज्यात थंडी वाढण्यास सुरवात होइल . राज्यातील अस्मानी संकटाची भिती संपली . आता राज्यात पूढील आठ दिवस पारा घसरणार आहे या आठवड्या कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.