अपरिमित शौर्य, विरतेचे प्रतिक महान योद्धा श्रीमंत मल्हारराव होळकर…!

मल्हारराव होळकर…!
अपरिमित शौर्य, विरतेचे प्रतिक महान योद्धा श्रीमंत
दिन विशेष 16 मार्च –
वैभवशाली होळकरशाहीचे संस्थापक, मराठेशाहीचे आधार स्तंभ, 52 युद्धाचे विजेता, विर पुरुष, माळवाधिपती, इंदौर नरेश, श्रीमंत मल्हाराव होळकर (Malharrao Holkar) यांनी आपल्या जिवनाची सुरुवात एक साधारण सैनिक म्हणून केली. तात्कालीन व्यवस्थेची उत्तम सुझबुझ असलेला एकमेव राजा, आपल्या बुद्धीचातुर्य, सुझबुझ, कुटनिती, रणनिती, सहास, रणकौशल्य, असामान्य धाडस, मनगटाच्या व तलवारीच्या बळावर पुण्यापासून ते दिल्ली व दिल्ली ते “दरिया -ए – अटक” (पाकिस्तान) अफगानिस्तान सिमेपर्यन्त “मराठेशाहीचा झेन्डा” फडकवून आपल्या पराक्रमाची ताकद संपुर्ण भारतखंडात व बाजूच्या देशात दाखवून देणारे राजे.
त्या काळी “आया मल्हार” कानी पडताच शत्रू सैनिक गावे सोडून जायची आणि गावे ओस पडायची. या वरून महायोद्धा मल्हारराव होळकरांच्या तलवारीची ताकत काय होती हे आपणास कळेल. श्रीमंत राजे मल्हारराव होळकरांनी आपल्या तलवारीच्या बळावर त्याकाळी मुघल, पठान, बंगश, रोहिले, राजपूत, जाट, बुंदेले यांना पराजित करूण अनेक राजे रजवाडे, सुलतान व नवाब यांचे कडून चौथाई वसूल केली.
या महान धनगर मराठा महायोद्ध्यांचे नांव इतिहासात अजरामर राहील जोपर्यन्त भारतात विरत्व, स्वदेशभक्ती, राजसंघटन, सामाजिक सुधारित व्यवहार याचा आदर होत राहील. केवळ प्रांत ताब्यात घेणं हा उद्धेश नाही तर पत्नी गौतमाबाई हिस 5 गावाची महसुली स्व खर्चासाठी देणारा महान राजा मल्हारराव होत. पुत्र खंडेरावांच्या मृत्यू पश्चात सनातनी वैदिक ब्राह्मणी कर्मकांड असलेल्या सतीप्रथेस फाटा देवून सून अहिल्याबाईस सती जाऊ न देता राजगादी सांभाळण्याचा निर्णय अजरामर झाला. राजमाता अहिल्याबाई या लोकमाता झाल्या याची सर्व पायाभरणी मल्हारराव आणि गौतमाबाई यांचीच होती.
मल्हारराव नसते तर आज आम्हाला अहिल्याबाईचे शौर्य, न्यायप्रिय कारभार, वात्सल्य, सामाजिक जाणिवेचा व्यवहार, आर्थिक दूरदृष्टी, परराष्ट्र धोरण पाहायला मिळाले नसते. एखादा राजा तलवारीच्या जोरावर देशात आणि देशाबाहेर गाजतो आणि सामाजिक स्तरावर देखील यशस्वीपणे मापदंड निर्माण करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थोरले राजे मल्हारराव होळकर….
आज १६ मार्च राजे मल्हारराव होळकर (Malharrao Holkar) यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या महान कार्यास मानाचा मुजरा…!
संकलन
सुधाकर सुखदेव शेळके
राज्यसचिव,महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य, मुंबई.