आवरगाव येथील गुढ आवाजाचं सत्य आलं समोर; आवाजाची मालिका सुरुच, भूजल सर्वेक्षणकडून पाहणी.

किल्लेधारुर दि.30 सप्टेंबर – धारुर (Dharur) तालुक्यातील आवरगाव या ठिकाणी दि.29 सप्टेंबर रोजी रात्री गुढ आवाज (mysterious voice) येत असल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण होवून ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. प्रशासनाकडून याची दखल घेत आज दि.30 रोजी गावात भुजल सर्वेक्षण विभागाकडून पाहणी करत ग्रामस्थांची भिती दुर करण्यात आली. मात्र आवाजाची मालिका सुरुच असून आजही जमीनीतून आवाज येत असल्याचे पत्रकार अविनाश जगताप यांनी माहिती दिली.
(The truth of the mysterious voice at Awargaon came to light; Survey from Groundwater Survey.)
याबाबत अधिक माहिती अशी की, काल दि.29 रोजी रात्री 10 च्या सुमारास जमिनीतून पहिल्यांदा गुढ आवाज आला, त्यानंतर साडेदहा वाजता दुसरा आवाज झाला तर रात्री एक वाजता तिसऱ्या वेळी जमिनीतून गुढ आवाजाने आवरगाव चांगलंच हादरलं. आवरगाव येथील ग्रामस्थांत घबराट पसरुन पूर्ण गाव भीतीमुळे लहान व वयोवृद्धांनी आवाजाच्या भीतीने पूर्ण रात्रभर जागरण करून सतर्कता बाळगली. मध्यरात्री तहसीलदार वंदना शेडोळकर, स.पो.नि. नितिन पाटील यांनी गावास भेट दिली.
दि.30 सप्टेंबर रोजी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा (Groundwater Survey Department Beed) बीडचे जी. एन. खाडे, टि.जी. डोंगरे, बी.आर.कुटे यांच्यासह तलाठी बालाजी पवार यांनी आवरगाव येथील विहिरीतील पाण्याची पातळीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की जास्त पावसामुळे जमिनीमधील पोकळीत पाणी गेल्याने त्यातील हवा बाहेर आल्यामुळे हे आवाज येत आहेत. हा भूकंपाचा (earthquake) काही प्रकार नाही असे या तज्ञानी सांगीतले. यावेळी आवरगावचे सरपंच अमोल जगताप, सुरेंद्र नखाते, अविनाश जगताप उपस्थीत होते.
जमिनीत पोकळी निर्माण झाल्याने आवरगाव येथे गुढ आवाज – जी. एन. खाडे
आवरगाव येथील जे काही आवाज आले त्या संदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही आवरगाव येथील विहिरीतील पाण्याची पातळी तपासणी केली. पण विहीरी या जमीन लेव्हल भरलेल्या आहेत, जास्त पावसामुळे जमिनीमधील जी पोकळी आहे त्यामध्ये पाणी गेल्याने त्यातील हवा बाहेर आल्यामुळे हे आवाज आले. हा भूकंपाचा काही प्रकार नसून घाबरण्याचे कारण नाही असे भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा बीडचे जी. एन. खाडे यांनी सांगीतले.