तीन दिवस पावसाचा इशारा; मराठवाड्यासह 16 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’.

पुणे दि.29 नोव्हेंबर – नोव्हेंबर महिना संपत असताना राज्यात अद्यापही बऱ्याच भागात थंडीची चाहुल लागलेली नाही. यंदा पावसाने अनेक राज्यात हाहाकार माजवलेला असून आणखी पुढचे काही दिवस राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा इशारा (Rain) हवामान विभागाकडून देण्यात येत आहे.
(Three days rain warning; ‘Yellow alert’ to 16 districts including Marathwada.)
अरबी समुद्र (Arabian Sea) आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे पुणे वेधशाळेने 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्यापार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद (Aurangabad), अहमदनगर, उस्मानाबाद (Osmanabad), लातूर (Latur), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ (Yellow alert) देण्यात आला आहे.
मुंबईतही पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) जारी केलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला मुंबईत (Mumbai) पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 30 नोव्हेंबरला मुंबईला यलो अॅलर्ट दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?
हवामान विभागानं सोमवारी 29 नोव्हेंबरसाठी रायगड, पुणे (Pune), सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. तर, 30 नोव्हेंबरसाठी ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आणि अहमदगर (Ahemadnagar) जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे.
सोमवारी यलो अॅलर्ट देण्यात आला नसला तरी ठाणे, मुंबई आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मंगळवारी सोलापूर, औरंगाबाद आणि पालघर जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले आहे. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात (Bay of Bengol) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही.