घाट रस्त्यामुळे वाढली डोकेदूखी….

किल्लेधारुर दि.११(वार्ताहर) शहरा जवळच्या घाट (Ghat) पायथ्याच्या रस्त्याचे होत असलेले काम वाहनधारकांसाठी सततची डोकेदुखी ठरत असुन सतत याठिकाणी वाहतूकीची कोंडी होवून तासनतास ट्राफीक (Traffic) जाम होत आहे.

धारुर शहरा नजीक घाट (Ghat) पायथ्याला राष्ट्रीय महामार्ग (NH) ५४८ सी खामगाव-सांगोला रस्त्यावर आरणवाडी साठवण तलावातील बुडीत क्षेत्रात रस्त्याचे उंची वाढवण्याचे काम चार महिन्यापासुन संथ गतीने सुरु आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या राष्ट्रीय महामार्गावर (NH) विविध साखर कारखान्याच्या ऊसाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. यात ट्रक, डबल ट्रॉली असलेले ट्रँक्टर सारख्या वाहनांची संख्या जास्त आहे. काही दिवसांपुर्वी कंत्राटदारांने रस्त्यावर विहीरीचे खरपण टाकुन रस्त्यावरच खडी फोडण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे अर्धा रस्ता बंद झाल्यामुळे रस्त्यावर तासन तास वाहतुक बंद पडत आहे. वास्तविक तात्पुरता बाह्यवळण रस्ता करुन काम करणे गरजेचे आहे. मात्र औरंगाबाद महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री.जाधव यांचे याकडे पुर्णतः दुर्लक्ष असुन नागरीक यामुळे त्रस्त झाले आहेत. याप्रश्नी संबंधितांनी तात्काळ पर्यायी रस्ता तयार करुन होत असलेली वाहतूकीची कोंडी (Traffic) चा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!