मुख्य वीज वाहिनी तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित

काम प्रगतीपथावर; पाच पर्यंत सुरळीत होण्याची शक्यता.

किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर) येथील ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्राला वीज पुरवठा करणारी मुख्य वीज वाहिनी तूटल्याने दोन वाजल्यापासुन शहराचा वीज पुरवठा खंडित असुन विजवाहकाची दुरुस्ती चालू असुन पाच वाजेपर्यंत पुरवठा सुरळीत सुरु होईल अशी माहिती येथील सहाय्यक अभियंता पेन्सिलवार यांनी माहिती दिली.

शहरातील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. रोज सांयकाळी व दिवसभरातून दर दोन तासाला वीज पुरवठा खंडित होतो. सध्या मान्सूनपुर्व कामे सुरु असल्याने अनेक वेळा विज पुरवठा खंडित होत आहे. आज शनिवारी सकाळी एकदा तर दुपारी दोन पासुन वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सहाय्यक अभियंता पेन्सिलवार यांच्याशी संपर्क साधला. यावर सदरील शहराला विज पुरवठा करणारी मुख्य वीज वाहिनी तूटली असून जोडण्याचे काम प्रगतीपथावर असून पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली. वीज मंडळाचे कर्मचारी गिरी महेश, दयानंद कापसे, सतीष आडे, रामहरी चाळक, अविनाश नखाते, शामराव पांढरपोते या कामावर विशेष परिश्रम घेत आहेत. वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता प्रताप निकम यावेळी प्रत्यक्ष साईटवर तळ ठोकून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!